Skip to main content

कुरुंदकरांचे सावरकर - Kurundkar on Savarkar

या देशातील विविध नागरिकांना विविध प्रकारचे हेतू असतात. सत्तास्पर्धेसाठी महापुरुषांच्या चारित्र्याचे हनन करणे हा उद्योग हा नवीन नाही. विशेषत: कम्युनिस्टांना हा सोडून कोणताच उद्योग करता येत नसल्याने, अथवा समाजात जाऊन उत्तम प्रबोधन करता येत नसल्याने, त्यासाठी वात्सल्यावर आधारलेल्या संघटना उभारता येत नसल्याने, व अखिल भारतीय एकसंध एकच पक्ष अनेक दशके चालवता येत नसल्याने, ते अभ्यास न करणाऱ्यांना बहकवण्यासाठी अधूनमधून इकडेतिकडे डांबरफेक करतात.
गेल्या काही काळामध्ये सावरकर, टिळक आणि रामदास अशा तिघांचे चारित्र्यहनन करणे हा तुम्ही "विचारवंत" असल्याचा पुरावा मानला जाऊ लागला. त्यामुळे सावरकरांची माफी, टिळकांचा जातिभेद आणि रामदासांचे गुरू नसणे यावर राळ उडवणे हे भूषण मानले जाऊ लागले.

दुसरीकडे या तिघांचे भक्तही तितकेच अविचारी निघू लागले. या तिघांचेही अनन्यसाधारण महत्त्व मोजक्या प्रभावी आणि तेजस्वी शब्दात सांगणे हे अनेक हिंदुत्ववाद्यांना जमत नाही. या तिघांच्याही आयुष्यात अजिबात चुका नाहीत असे नाही.

चिकित्सा करूनही एखाद्या माणसाला वंदनीय मानणे, हा जणू आजच्या काळात गुन्हा झाला आहे.

सावरकर, टिळक, रामदास यांना वंदनीय मानायचे नाही असा अध्यादेश तथाकथित पुरोगाम्यांनी काढलेला असून, या तिघांची अजिबात चिकित्सा करायची नाही असे वातावरण हिंदुत्ववाद्यांमध्ये असते. या उलट गांधी, नेहरू, आंबेडकर, शाहू, फुले, यांची चिकित्सा न करणे हा पुरोगामित्व मिरवण्यासाठी अत्यावश्यक गुण असून, यांना दुर्लक्षित करणे हा तुम्ही हिंदुत्ववादी असण्यासाठी अत्यावश्यक गुण झालेला आहे.

या दोन्ही बाजूंच्या गुणदोषांपासून (बऱ्यापैकी अलिप्त) असलेले नरहर कुरुंदकर यांनी विविध व्यक्तींची रेखाटने करताना अतिशय समतोल पद्धतीने चिकित्सा आणि वंदनीयता जोपासली आहे. 
कुरुंदकरांचा सावरकरांवरील लेख मराठी वाचकांमध्ये अतिशय प्रसिद्ध असून अमराठी भाषकांसाठी तो इंग्रजीतून उपलब्ध करून द्यावा असे वाटत असल्याने इथे भाषांतर करून देत आहे. 

मराठवाड्यातील निजामी वातावरणात मुस्लिम अतिरेकीपणामुळे झालेले अत्याचार कुरुंदकरांनी दुर्लक्षिले नाहीत. त्यामुळे त्यांनी सावरकरांच्या हिंदुत्वाची भीतीने अथवा अज्ञानापोटी अवहेलना केली नाही. ते सावरकरांचे भक्त नसले, तरी सावरकरांचे एक चांगले मूल्यमापन त्यांनी केले आहे, असे वाटल्याने तो लेख सर्वांनी वाचावा असा आग्रह करत आहे. 

कुरुंदकरांच्या प्रकाशकीय हक्कांविषयी कोणाला कसे विचारायचे हे माहित नसल्याने परस्पर इंग्रजी लेख देत आहे, संपर्क मिळाल्यास परवानगी मागण्याची इच्छा आहे. 
लेखन: नरहर कुरुंदकर, पुस्तक - अन्वय
भाषांतर: वेद गुमास्ते
भाषांतर संपादन: नचिकेत नित्सुरे 

लेख इथे मिळेल: इंग्रजी लेख

Comments

  1. सध्या कुठल्यातरी एका बाजूचे असलात तर तुम्हाला ओळख असते! याचे कारण 'अभ्यासोनी प्रकटावे' पेक्षा 'टाहो फोडून प्रसिद्ध पावावे' यातच धन्यता वाटणारे अभ्यासक(?) निर्माण होत आहेत त्यामुळे नेमके, विचारपूर्वक, पण धाडसाने लिहिणारे दुर्मीळ होऊ लागलेत....चांगले मांडले आहे.

    ReplyDelete
  2. समर्थ रामदासांना नक्की कोणकोणत्या बाबींमधून समजून घेतले पाहिजेत यावर सविस्तर लेख लिहला तर उत्तम होईल. त्यामुळे लिहिलेले श्लोक वाचून आजही व्यवहारवाद आणि विज्ञानवादी दृष्टिकोन प्रकर्षाने दिसतो. त्यामुळे त्याचे अजून बरेच आयाम तुझ्या दृष्टिकोनातून सखोलपणे मांडलेस तर उत्तम होईल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गीता समजून घेताना - १

 गीता समजून घेताना - १ कालच्या गीताजयंतीच्या निमित्ताने आज लिहित आहे. गेले काही महिने काही जण गीतेचा अभ्यास करत आहोत. या अभ्यासाची सुरुवात गीतेच्या श्लोकांच्या विभागणीतून झाली. गीतेची १८ अध्यायांमध्ये विभागणी ही मूळ व्यासांनी केलेली विभागणी आहे असे मानू. ज्ञानेश्वर महाराज, शंकराचार्य यांनी प्रत्येक श्लोकावर भाष्य लिहिली. ती पद्धतच आहे. एकेक श्लोक घ्यायचा, त्यावर निरूपण लिहायचे. लोकमान्य टिळकांनीही गीतारहस्यात ही परंपरा सोडलेली नाही. त्यांनीही गीतेचा अर्थ लिहिता लिहिता आपले भाष्य त्यावर गद्य रूपात नोंदवले आणि त्या शिवाय १४-१५ प्रकरणांमध्ये तौलनिक तत्त्वज्ञान, प्रासंगिकता, नीतीशास्त्र अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे निबंधात्मक चिंतन मांडले. दोन्ही मिळून गीतारहस्य ग्रंथ तयार झाला.  १) क्रमाने विनोबांनी रसाळ भाषेत गीताप्रवचने लिहिली. त्यात श्लोकांच्या आधारे मांडणी नाही. संपूर्ण अध्यायावर एक छोटे प्रवचन असे स्वरूप देऊन त्या त्या अध्यायातील महत्त्वाच्या संकल्पनांचे सुबोध विवेचन असे गीताप्रवचनाचे स्वरूप राहिले. हे करताना विनोबांनी प्रत्येक अध्यायाचेही विषयांनुसार तुकडे पाडले. त्यांना अध...

धुरंधर -२ च्या निमित्ताने

SPOILER ALERT  कथानकातील काही घटनांचा थेट उल्लेख आहे, त्यामुळे आधी चित्रपट पाहून मग इथे आलेले चांगले.  धुरंधर -२ पाहिला.  अनेकांनी त्याच्या विविध पैलूंवरती पुष्कळ लिहिले आहे. बरे-वाईट दोन्ही लिहिले आहे. "पीक-डिटेलिंग" वर व्यंगचित्रेही बनवून झाली. सहसा वाचनात न आलेलं एक उदाहरण देऊन मुख्य मुद्द्याकडे जाऊ - एका अतिरेक्याला मारायला एक परिचारिका (नर्स) येते, तिची भूमिका यामी गौतम यांनी म्हणजे आदित्य धर यांच्या पत्नीने केलेली आहे. त्या परिचारिकेचे नाव शझिया बानो ठेवलेले आहे. तिच्या कपड्यांवरील नामपट्टीकडे सहज लक्ष जात नाही म्हणून ते लक्षात येत नाही. शझिया बानो हेच यामी गौतम यांच्या नुकत्याच आलेल्या "हक" या नितांत सुंदर चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेचे नाव आहे.  हा तपशील मांडण्याचे कारण धुरंधरच्या तत्त्वज्ञानाशी जोडलेले आहे असे वाटते. कसे ते हळू हळू पाहात जाऊ. धुरंधर -१ हे मुख्यत: वातावरण निर्मितीसाठीची तयारीच आहे. पाकिस्तानातील विविध गट, त्यांच्यातील लढाया, त्यांच्यातील ईर्ष्या / स्पर्धा, बलुच स्वातंत्र्यलढा याबद्दल पुरेशी पार्श्वभूमी तयार केली नसती तर भाग-२ मधील घटनांचा अ...

Nationalism, Humanity and Long term Future - Note 1

आपला राष्ट्रवाद हा मानव्याच्या हितासाठी आहे, हे प्रत्येक राष्ट्राला दाखवून द्यावे लागेल.  असे काही निकष असतील की ज्यांच्या आधारे प्रत्येक राष्ट्राने मानव्याच्या हितासाठी काम केले आहे की नाही याचे मूल्यमापन करता येईल. असे मूल्यमापन करण्याच्या निकषांपैकी प्रत्येक निकषांचे राष्ट्रागणिक महत्त्व बदलेल. प्रत्येक राष्ट्राचा निकषसंच वेगळा तयार होईल. जे आपले निकष इतरांना पटवून देऊ शकतील, त्यांना अधिक महत्त्व येईल. अशा निकषांवर उतरलेली जी राष्ट्रे मानव्याच्या हितासाठी काम करत आहेत, त्या राष्ट्रांची घडण व प्रगती झाली तरच मानव्याची प्रगती होईल हे उघड आहे.  मानव्याचा इतिहास १५००० वर्षांच्या पलीकडे जात नाही. जागतिक रचना कशाबशा लागलेल्या आहेत आणि जग बहुध्रुवीय झालेले आहे अशी आजची स्थिती आहे. ती स्थिती थोडीफार बदलेल, काही राष्ट्रांना स्वत:मध्ये प्रचंड बदल करावे लागतील. काही संस्कृतीही स्वत:ला बदलून घेतील. हे झाले की अशा नवीन व्यवस्थेचे आयुष्य वाढते कसे ठेवायचे हा प्रश्न असेल. सध्याचे तिचे आयुष्य फार तर शंभरेक वर्षांचे आहे. किमान हजार वर्षांचे भवितव्य समोर मांडल्याशिवाय चांगली प्रेरणादायक उद्द...