Skip to main content

Posts

My take on Dhurandhar 2

Spoiler Alert: Key events being discussed from the film. So will be better to watch it first and then come here. Note: Did not think of writing this post in English, but a few friends asked, so here it goes. Dhurandhar-2: A Philosophical Analysis Many people have written extensively about this film from various angles. It has earned both praise and harsh criticism - sometimes well-founded sometimes out of sheer hypocrisy. Memes about “peak detailing” have all made the rounds. Let me bring up one detail that hasn’t received much attention, and then move towards the central point of my take. In one scene, a nurse comes to kill a terrorist — this role is played by Yami Gautam, wife of director Aditya Dhar. The character’s name, visible on her nameplate - but easy to miss, is Shazia Bano — which is also the name of the protagonist in Yami Gautam’s recently made beautiful film Haq . That’s not a coincidence.  The reason to mention this details is connected to the very philosophy of Dhu...
Recent posts

धुरंधर -२ च्या निमित्ताने

SPOILER ALERT  कथानकातील काही घटनांचा थेट उल्लेख आहे, त्यामुळे आधी चित्रपट पाहून मग इथे आलेले चांगले.  धुरंधर -२ पाहिला.  अनेकांनी त्याच्या विविध पैलूंवरती पुष्कळ लिहिले आहे. बरे-वाईट दोन्ही लिहिले आहे. "पीक-डिटेलिंग" वर व्यंगचित्रेही बनवून झाली. सहसा वाचनात न आलेलं एक उदाहरण देऊन मुख्य मुद्द्याकडे जाऊ - एका अतिरेक्याला मारायला एक परिचारिका (नर्स) येते, तिची भूमिका यामी गौतम यांनी म्हणजे आदित्य धर यांच्या पत्नीने केलेली आहे. त्या परिचारिकेचे नाव शझिया बानो ठेवलेले आहे. तिच्या कपड्यांवरील नामपट्टीकडे सहज लक्ष जात नाही म्हणून ते लक्षात येत नाही. शझिया बानो हेच यामी गौतम यांच्या नुकत्याच आलेल्या "हक" या नितांत सुंदर चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेचे नाव आहे.  हा तपशील मांडण्याचे कारण धुरंधरच्या तत्त्वज्ञानाशी जोडलेले आहे असे वाटते. कसे ते हळू हळू पाहात जाऊ. धुरंधर -१ हे मुख्यत: वातावरण निर्मितीसाठीची तयारीच आहे. पाकिस्तानातील विविध गट, त्यांच्यातील लढाया, त्यांच्यातील ईर्ष्या / स्पर्धा, बलुच स्वातंत्र्यलढा याबद्दल पुरेशी पार्श्वभूमी तयार केली नसती तर भाग-२ मधील घटनांचा अ...

शिवचरित्र आणि प्रेरणा

 शिवचरित्र हा माझ्या साऱ्या अस्तित्वाचा सर्वात आतला कठीण - न तुटणारा - गाभा आहे. मी पाचवीत असतानाच आमच्या घरी जुनं राजा शिवछत्रपती मिळालं. दोन दिवसांमध्ये दोन्ही खंड वाचून झाले. कुठेही मार्ग कुंठले, अस्वस्थता आली की शिवचरित्र काढून वाचत बसावे. एकदा २०२४ च्या लोकसभेच्या निकालांनंतर असाच नाशिकवरून पुण्याला येत होतो. मनात अस्वस्थताच होती. जातीय राजकारण आणि धार्मिक राजकारणात हिंदू संघटित होत जाताना क्रमश: काही वेळा उतार येतात. तसा हा एक उतार मानता येईल. अभावितपणे मी गाडी चालवता चालवता काही तरी ऐकायचे म्हणून निनाद बेडेकरांची सलग व्याख्यानं लावली. सलग प्रवासात ३-४ व्याख्यानं ऐकून झाल्यावर मला खूपच आधार मिळाला. छत्रपतींना तर याहून भीषण धर्मांधतेच्या अंध:काराला मागे रेटावं लागलं होतं. आपण अनेक लढाया नंतर जिंकत आलेलो आहोत. अजूनही जिंकण्याच्या स्थितीत जाणार आहोत, हा शिवचरित्रानेच प्रेरणा देण्याचा लख्ख प्रसंग मला आठवतोय. असंख्य ठिकाणी शिवचरित्रातली वाक्ये व प्रसंग उद्धृत करून निर्णय दिलेले मला आठवत आहेत. गेली अनेक वर्षं राजकीय गणिते जुळवण्यासाठी जातीयवाद महाराष्ट्रात फोफावला जातोय. त्याने माझ...

गीता समजून घेताना - १

 गीता समजून घेताना - १ कालच्या गीताजयंतीच्या निमित्ताने आज लिहित आहे. गेले काही महिने काही जण गीतेचा अभ्यास करत आहोत. या अभ्यासाची सुरुवात गीतेच्या श्लोकांच्या विभागणीतून झाली. गीतेची १८ अध्यायांमध्ये विभागणी ही मूळ व्यासांनी केलेली विभागणी आहे असे मानू. ज्ञानेश्वर महाराज, शंकराचार्य यांनी प्रत्येक श्लोकावर भाष्य लिहिली. ती पद्धतच आहे. एकेक श्लोक घ्यायचा, त्यावर निरूपण लिहायचे. लोकमान्य टिळकांनीही गीतारहस्यात ही परंपरा सोडलेली नाही. त्यांनीही गीतेचा अर्थ लिहिता लिहिता आपले भाष्य त्यावर गद्य रूपात नोंदवले आणि त्या शिवाय १४-१५ प्रकरणांमध्ये तौलनिक तत्त्वज्ञान, प्रासंगिकता, नीतीशास्त्र अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे निबंधात्मक चिंतन मांडले. दोन्ही मिळून गीतारहस्य ग्रंथ तयार झाला.  १) क्रमाने विनोबांनी रसाळ भाषेत गीताप्रवचने लिहिली. त्यात श्लोकांच्या आधारे मांडणी नाही. संपूर्ण अध्यायावर एक छोटे प्रवचन असे स्वरूप देऊन त्या त्या अध्यायातील महत्त्वाच्या संकल्पनांचे सुबोध विवेचन असे गीताप्रवचनाचे स्वरूप राहिले. हे करताना विनोबांनी प्रत्येक अध्यायाचेही विषयांनुसार तुकडे पाडले. त्यांना अध...

... यांची तेजस्वी परंपरा म्हणजे मी! - पूरक मुद्दे

 वरील शीर्षक असणाराच लेख पूर्वी पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांनी "भारताचा राष्ट्रवाद" या संग्रहात मांडलेला आहे. मनुष्याला सुटे अस्तित्व नसून, तो अनेक परंपरांचा परिणाम असतो. असे या लेखात अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शविले आहे. मला अनेक परंपरांचा परिणाम म्हटला की मॅट्रिक्स सिनेमा आठवतो. त्यात, मॅट्रिक्सचा आरेखक (the Architect) कथानायकाला असे सांगतो की तुझे त्याच्याकडे - आरेखकाकडे जाणे - हे अनेक घटनांच्या बेरजेचा परिणाम आहे. अशा परंपरांकडे तुच्छतेने वा द्वेषाने बघण्याची दृष्टी मार्क्स वा त्याच्या सारख्या जगभराच्या अर्धवट विचारवंतांकडेच, किंवा छद्म-उदारमतवादी लोकांकडे असू शकते. परंपरांनी "नाही रे" वर्गाचे शोषण करणे शक्य होते, हे वादापुरते मानू. परंपरा सतत सुधारत्या राहिल्या आहेत, व परंपरांची बेरीजच अस्तित्वाचे सातत्य टिकवून धरते, हे मार्क्सिस्टांना  अथवा त्यांच्या भारतातील ०.००५% संपृक्त भ्रष्ट नकलांना कधी कळलेच नाही असे मला स्पष्टपणे वाटते.  पुगंच्या लेखात परंपरा, त्यांचे औचित्य, कालानुरूप बदल करणे इ. अनेक मुद्द्यांचा सविस्तर ऊहापोह केलेला आहे. त्यासाठी हा लेख नाहीच. पु...

कॅथॉलिक चर्च या संघटनेचा अभ्यास

कल्पेशदादाने ज्ञान प्रबोधिनी, पुणे व्हॉट्सॅप गटावर पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली. माझी पण त्यांना श्रद्धांजली. जागतिक बंधुता आणि पर्यावरण या विषयांवर कट्टर, सनातनी वाटणाऱ्या चर्चचे प्रमुख म्हणून चांगले लेखन व कृती करणारे धार्मिक नेते म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. पोप फ्रान्सिस यांनी अनेक नवे बदल चर्चमध्ये घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आधीचे पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी प्रकृतीअस्वास्थ्यास्तव राजीनामा दिला. त्यामुळे त्यांचा मृत्यू होईपर्यंत एक वर्तमान पोप म्हणून फ्रान्सिस आणि पोप इमेरिटस बेनेडिक्ट हे दोघेही एकाच वेळी जिवंत होते.  या दोघांच्या संबंधावर एक छान चित्रपट आलेला होता. नेटफ्लिक्सवर आहे.जरूर पाहावा. या लेखाशी थोडाफार संबंधितही आहे. या चित्रपटाविषयी अजून जाणून घेण्यासाठी -  विकिपीडिया लिंक  .  आपण २००० वर्षं टिकेल अशी संघटना करायचं जेव्हा म्हणतो तेव्हा उदाहरण म्हणून चर्चचे उदाहरण समोर ठेवावेच लागेल. पोप फ्रान्सिस हे २६६ वे पोप आहेत. युरोप ग्रामावस्थेत असल्यापासून मध्ययुगपूर्व युरोपीय व्यवस्था, मध्ययुग, मध्ययुगात राज्यव्यवस्था आपल्या हातात ठेवणे, तिचा...

Kurundkar on Savarkar

  Article Link:  Here      Citizens of this country have many motives. Character-assassination of great sons and daughters of India for gaining an edge in Vote-bank politics is not a new trend. Specifically, the communists, because they can't run businesses, can't enlighten the society by mixing therein, can't forge organizations based on Harmoniousness, and run a pan-India party for decades without getting split, entrench in mud-slinging to sway the un-studied.      In recent times, mud-slinging on Tilak, Savarkar, and Ramdas has become proof of one becoming an "intellectual". It is considered a fait-accompli to question Savarkar's mercy petitions, Tilak’s politics of Castes, and whether Ramdas was really a  guru  of Chhatrapati Shivaji Maharaj.      On the other hand, those who idolize the above three, have displayed a lot of foolishness. Expounding the greatness of these three in measured and powerful words is not a...