आपला राष्ट्रवाद हा मानव्याच्या हितासाठी आहे, हे प्रत्येक राष्ट्राला दाखवून द्यावे लागेल. असे काही निकष असतील की ज्यांच्या आधारे प्रत्येक राष्ट्राने मानव्याच्या हितासाठी काम केले आहे की नाही याचे मूल्यमापन करता येईल. असे मूल्यमापन करण्याच्या निकषांपैकी प्रत्येक निकषांचे राष्ट्रागणिक महत्त्व बदलेल. प्रत्येक राष्ट्राचा निकषसंच वेगळा तयार होईल. जे आपले निकष इतरांना पटवून देऊ शकतील, त्यांना अधिक महत्त्व येईल. अशा निकषांवर उतरलेली जी राष्ट्रे मानव्याच्या हितासाठी काम करत आहेत, त्या राष्ट्रांची घडण व प्रगती झाली तरच मानव्याची प्रगती होईल हे उघड आहे. मानव्याचा इतिहास १५००० वर्षांच्या पलीकडे जात नाही. जागतिक रचना कशाबशा लागलेल्या आहेत आणि जग बहुध्रुवीय झालेले आहे अशी आजची स्थिती आहे. ती स्थिती थोडीफार बदलेल, काही राष्ट्रांना स्वत:मध्ये प्रचंड बदल करावे लागतील. काही संस्कृतीही स्वत:ला बदलून घेतील. हे झाले की अशा नवीन व्यवस्थेचे आयुष्य वाढते कसे ठेवायचे हा प्रश्न असेल. सध्याचे तिचे आयुष्य फार तर शंभरेक वर्षांचे आहे. किमान हजार वर्षांचे भवितव्य समोर मांडल्याशिवाय चांगली प्रेरणादायक उद्द...
गीता समजून घेताना - २ प्रबोधिनीचे काम करताना विविध सहकारी, वरिष्ठ आणि मित्रांशी अनेकानेक विषयांवर चर्चा होत असतात. एकांनी मला नुकतेच फेसबुकवरील एका ताईंचे लेखन पाठवले. त्यांच्या लेखनाबद्दल आदर वाटला. मुद्दे योग्य आहेत असेही वाटले. पण या ब्लॉगचा मूळ मुद्दा तो नाही, म्हणून लिंक कॉमेंटमध्ये ढकलत आहे. त्यांचा मुद्दा " अद्वैत तत्त्वज्ञानच अधिकाधिकांपर्यंत पोचते करणे महत्त्वाचे - कर्मकांडांनी नुकसान होते " अशा स्वरूपाचा आहे. मूळ मुद्दा गैर नाही. तो मान्य करूनही, मला त्याबद्दल काय वाटते आहे ते नोंदवत आहे. गीता समजून घेताना - या प्रवासाचाच तो भाग आहे. म्हणून आधीच्या लेखनाचा आधार घेऊन पुढे जात आहे. आधीचा लेख वाचला तरच हा लेख अधिक समजेल असे काही नाही. (गीतेवरील पहिला लेख) ब्लॉग जिथे लिहायला बसलोय, तिथे घरात समोर भिंतीवर एक अतिशय सुंदर परिच्छेद फळ्यावर लिहिलेला आहे. " सर्व प्रकारच्या परस्परविरोधी नि परस्परविसंगत वाटणाऱ्या पंथोपपंथांमध्ये हेच एक तत्त्व मुळाशी गोवलेले आहे की, सर्व सामर्थ्य, सर्व शुद्धता, सर्व वैभव हे आत्म्यामध्ये मूलत:च आहे. रामानुजाचार्यांच्या मताप्रमाणे हा आत्म...